Gayatri Bhalerao

Gayatri Bhalerao

MA-History, MA-Indology, M. Phil-History

Shakuntala Paranjpe

शकुंतला परांजपे -(१९०६-२०००) पद्मभूषण, विधानपरिषद सदस्य शकुंतला परांजपे यांचे संततीनियमनाचे कार्य हे खूप मोठे आहे. त्यांचे वडील म्हणजे रँग्लर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे हे इंग्लंडला जाऊन गणितातली सिनियर रँग्लर ही अत्यंत मानाची पदवी मिळवणारे पहिले भारतीय होते. शकुंतला या त्यांच्या एकुलत्या…

Laxmibai Tilak

लक्ष्मीबाई टिळक(१८६८-१९३६) ‘साहित्यलक्ष्मी’ लक्ष्मीबाई या कवी नारायण वामन टिळक यांच्या पत्नी. त्याकाळातील अत्यंत सुरेख सहजीवन जगलेले हे जोडपे होते. दोघे यथेच्छ भांडत असत, एकमेकांच्या उणीव,दोष दाखवून देत पण परस्परांविषयीच्या गाढ प्रेमाचा पाया त्यांच्या सहजीवनाला लाभला होता. ज्या काळात स्त्रिया नवऱ्यापुढे…

Parvatibai Athavle

पार्वतीबाई आठवले-(१८७०-१९५५)पार्वतीबाई या बाया कर्वे यांच्या लहान भगिनी होत्या. वयाच्या ११ व्या वर्षी त्यांचे लग्न पायातून अधू असणाऱ्या मुलाशी झाले. विसांव्या वर्षी पतीचे निधन झाल्याने त्या लहानग्या नारायणाला घेऊन माहेरी आल्या. काही दिवसातच बाया कर्वे यांनी नारायणाच्या शिक्षणासाठी त्यांना पुण्यात…

Anandibai Karve

बाया/आनंदीबाई कर्वे – (१८६५-१९५०) गोदुबायाचे लग्न आठव्या वर्षी झाले. लग्नानंतर दोनच महिन्यात त्यांच्या पतीचे निधन झाले. सुरुवातीला सासरी त्यांच्यावर विधवेची कोणतीच बंधने नव्हती. मात्र सासूबाई आजारी पडल्यावर त्यांना केशवपन करावे लागले, बंधने पाळावी लागली. त्यामुळे त्यांच्या भावाने त्यांना आपल्याबरोबर मुंबईस…

Janakka Shinde

जनाक्का शिंदे -(१८७८-१९५६) जनाक्का शिंदे या विठ्ठल रामजी शिंदे यांच्या भगिनी व सामाजिक कार्यकर्त्या होत्या. विवाहानंतरही त्यांचे शिक्षण चालू होते. त्यांच्या सासऱ्यांच्या त्यांच्या शिक्षणाला पाठिंबा होता. परंतु त्यांच्या अशिक्षित पतीला मात्र स्वतः हि शिकायचे नव्हतं आणि बायकोने शिकलेलेही चालत नव्हते.…

Kashibai Kanitkar

काशीबाई कानिटकर-(१८६१-१९४८) काशीबाई कानिटकर या मराठीतल्या आद्य चरित्रलेखिका होत. वयाच्या ९व्या वर्षी त्यांचे लग्न वकील गोविंदराव कानिटकर यांच्याशी झाले. ते सुधारणावादी होते. काशीबाई गोविंदरावांच्या समोर रूपाने उजव्या नव्हत्या. परंतु शिकलीसवरली तर संसार होऊ शकतो असे गोविंदरावांचे म्हणणे होते. त्यामुळे काशीबाईंनी…

Rakhmabai Raut

रखमाबाई राऊत-(१८६४-१९५५) आईच्या पुनर्विवाहानंतर छोटी रखमा डॉक्टर सखाराम अर्जुन राऊत यांची मुलगी झाली. लग्न ठरण्यापूर्वी त्यांच्या आई जयंतीबाईंनी डॉक्टरांना पत्र लिहून लग्न करण्याची इच्छा कळवली होती. डॉक्टर राऊतांच्या घरी राहून रखमाबाई प्रगल्भ होत गेल्या. परंतु आजोबांनी आणलेल्या स्थळाशी वयाच्या ११व्य…

Ramabai Ranade

रमाबाई रानडे-(१८६२-१९२४) वयाच्या अकराव्या वर्षी महादेव गोविंद रानडेंसारख्या सुधारकांची द्वितीय पत्नी म्हणून रमाबाई पुण्यात आल्या. महादेव रानड्यांच्या मनाविरुद्ध हे लग्न झाले असले तरी रमाबाईंनी मात्र पतीला साजेसे होण्याचे मनोमन ठरवले होते. लिहिण्यावाचण्याने स्त्री विधवा होते हा माहेरचा समज मागे सोडून…

Pandita Ramabai

पंडिता रमाबाई -(१८५८-१९२२) रमाबाईंचे वडील अनंतशास्त्री हे विद्वान पंडित होते. कुटुंबाबरोबर तीर्थयात्रा करताकरता रमाबाईंना आजूबाजूची परिस्थिती जाणवत होती. सर्वत्र होणारी स्त्रियांची पिळवणूक, विधवांची दयनीय अवस्था त्यांना दिसत होती. त्यांच्या वडिलांनी त्यांचा विवाह सज्ञान होईपर्यंत करायचा नाही असे ठरवले होते. दुष्काळाच्या…

Savitribai Phule

सावित्रीबाई फुले – १ जानेवारी १८४८ रोजी जोतीरावांनी पुण्याच्या बुधवार पेठेतील भिडे वाड्यात मागासवर्गीय मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि सावित्रीबाई वयाच्या १७ व्या वर्षापासून त्या शाळेत विनावेतन शिकवू लागल्या. त्या शाळेच्या पहिल्या शिक्षिका व मुख्याध्यापिका झाल्या. १८५१ मध्ये फुले…